परतीचा पाऊस
© चन्द्रहास।
कुठेही गेलो आपण जगात;
मन आपलं तिथेच असतं.
याचं खरं कारण सांगू?
आपलं विश्व तिथेच असतं.
परतीचा पाऊस, अंधारलेला दिवस
कासावीस होतो तेव्हा जीव
कारण मनानं कधीच; होय, कधीच
ओलांडलेली नसते ती शीव
ना विसरता येतं ते डबा खाणं
कट्ट्यावरचं आपलं चहा पिणं
दाट धुक्यात सूचलेली ती कवणं
अन एकमेकांना हास हास हसवणं
NSB मधील सर्व Friendsना समर्पित...
No comments:
Post a Comment