परतीचा पाऊस
© चन्द्रहास।
कुठेही गेलो आपण जगात;
मन आपलं तिथेच असतं.
याचं खरं कारण सांगू?
आपलं विश्व तिथेच असतं.
परतीचा पाऊस, अंधारलेला दिवस
कासावीस होतो तेव्हा जीव
कारण मनानं कधीच; होय, कधीच
ओलांडलेली नसते ती शीव
ना विसरता येतं ते डबा खाणं
कट्ट्यावरचं आपलं चहा पिणं
दाट धुक्यात सूचलेली ती कवणं
अन एकमेकांना हास हास हसवणं
NSB मधील सर्व Friendsना समर्पित...