© चन्द्रहास सोनपेठकर
विस्मयित होतो मी पुन्हा चालताना।।
कुणी दाविले बेमौसमी मोहरे।
कुणी देईले गंधाळले मोगरे
कुणी भारीले श्वास नवा घेताना।।
गर्दीत पूरता विसरून गेलो।
माझे मीपण हरवून बसलो
मुरलीधराला शरण जाताना।।
मन पुन्हा मागे वळता वळेना।
दिव्यत्वाची प्रचीती पाहताना
गुणाकार सुखाचा सवें हासताना।।